Author: admin

  • बिग बॉस मराठी 6 मध्ये अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात तुफान वाद, व्हिडिओ व्हायरल

    Bigg Boss Marathi 6 मध्ये दिवसेंदिवस नाट्य अधिकच वाढत चाललं आहे. नुकताच घरात अनुश्री माने आणि राकेश बापट यांच्यात झालेला जोरदार वाद सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    वादाच्या दरम्यान अनुश्री माने भावनिक होत म्हणाली,

    “मला तू हाताला धरून माझ्या बेडवरून उठवलास ना, तिथे माझ्या डोक्यात गेलास तू.”

    अनुश्रीच्या या वक्तव्यावर राकेश बापट संतापला आणि त्याने स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
    तो म्हणाला,

    “हे बोलणं चुकीचं आहे. Do not bloody say that again. आयुष्यात मी पंचवीस वर्ष एवढं काम केलंय. कोणाची हिंमत आहे की मला असं बोललं जाईल?”

    इतक्यावरच न थांबता राकेशने पुढे असंही सांगितलं की,

    “मला या घरात थांबायचं नाही आहे.”

    या वादानंतर घरातील वातावरण पूर्णपणे तापले असून इतर सदस्यही हादरल्याचं पाहायला मिळालं. प्रेक्षकांमध्ये या घटनेवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून काहीजण अनुश्रीची बाजू घेत आहेत, तर काहीजण राकेशला पाठिंबा देत आहेत.

    हा वाद Bigg Boss Marathi 6 च्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त क्षणांपैकी एक ठरणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पुढील भागात बिग बॉस काय निर्णय घेतो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

  • “तुमच्या जिभेचा तोल जायला लागलाय!” – भाऊचा धक्का प्रोमोमध्ये रितेश देशमुखांनी तन्वी कोलतेची घेतली शाळा

    Bigg Boss Marathi 6 मध्ये यंदा ड्रामा, वाद आणि टोकाच्या प्रतिक्रिया सातत्याने पाहायला मिळत आहेत. आजच्या भाऊचा धक्काच्या प्रोमोने मात्र प्रेक्षकांचे लक्ष पूर्णपणे वेधून घेतले आहे. शोचा होस्ट रितेश देशमुख यावेळी घरातील स्पर्धक तन्वी कोलते यांच्यावर थेट आणि स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करताना दिसतो.

    “तू या घराची तंटा क्वीन आहेस” – रितेश देशमुख

    प्रोमोमध्ये रितेश देशमुख तन्वीला म्हणतो—

    “तन्वी कोलते किती बोलते. तुम्ही आहात या घराच्या तंटा क्वीन.तुम्हाला फक्त बोलायचं असतं, भांडायचं असतं आणि ते झालं की मग रडायचं असतं.तुमच्या जिभेचा तोल जायला लागलाय.”

    इतक्यावर न थांबता, ते पुढे ठाम शब्दांत सांगतात—

    “मी बोलतोय, थांबा एक मिनट.”

    हे शब्द ऐकून घरातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाल्याचे प्रोमोमध्ये स्पष्ट दिसते.आजच्या भागात काय पाहायला मिळणार?

    या प्रोमोमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत—

    तन्वी या टीकेला कशी प्रतिक्रिया देणार?

    घरातील इतर सदस्य कोणाची बाजू घेणार?

    वाद आणखी चिघळणार की काही तोडगा निघणार?

    याची उत्तरं आजच्या भागात मिळणार आहेत.

    कधी आणि कुठे पाहायचा?

    हा धमाकेदार भाऊचा धक्का भाग आज रात्री ८ वाजताColors Marathi आणि Jio Hotstar वर प्रसारित होणार आहे.

    Bigg Boss Marathi 6 मधील ताज्या अपडेट्स, प्रोमो बातम्या आणि एक्सक्लुझिव्ह गॉसिपसाठी आमच्या वेबसाइटला भेट देत राहा.

  • बिग बॉस मराठी ६ : अनुश्री माने विरुद्ध दिव्या शिंदे – वादाने पेटलं घर, प्रेक्षक काय म्हणतात?

    Bigg Boss Marathi 6 सध्या चांगलाच रंगात आला असून, प्रत्येक टास्कसोबत घरातील वातावरण अधिक तापताना दिसत आहे. नुकत्याच पार पडलेल्या कॅप्टन्सी टास्कने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

    बिग बॉसने कॅप्टन्सीसाठी स्पर्धकांना ‘बीबी फार्म’ हा खास टास्क दिला होता. या टास्कदरम्यान अनुश्री माने आणि दिव्या शिंदे यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

    प्रोमोमध्ये दिसते की अनुश्री दिव्याला, “तू नको सांगू” असे म्हणते. त्यावर दिव्या, “मी माझं मत मांडतेय” असे म्हणत इंग्रजीत, “You are not supposed to tell me” असे उत्तर देते. यावर अनुश्री चांगलीच संतापलेली दिसते.

    अनुश्री दिव्याला सुनावत म्हणते,

    “मराठी शोमध्ये आहेस, मराठी बोलायला शिक. इंग्लिश बिग बॉसमध्ये जा.”

    यावर दिव्याही शांत बसत नाही. ती स्पष्ट शब्दांत प्रत्युत्तर देत म्हणते,

    “वाढीवपणा तुझ्याजवळ ठेव. विषय संपला.”

    या वादामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून सोशल मीडियावरही या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे. काही प्रेक्षक अनुश्रीच्या भूमिकेचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काही जण दिव्याच्या मत मांडण्याच्या हक्काचं समर्थन करत आहेत.

    दरम्यान, हा वाद पुढे काय वळण घेणार? घरातील समीकरणांवर याचा काय परिणाम होणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    तुम्हाला काय वाटतं? अनुश्रीचं म्हणणं योग्य आहे का, की दिव्याची भूमिका बरोबर आहे? तुमचं मत नक्की कळवा.

  • कॉमेडीवर केलेल्या वक्तव्यामुळे वाद; विशाखा सुभेदार यांचा तन्वी कोलतेवर संताप

    बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या कॅप्टन्सी टास्कदरम्यान झालेल्या वादामुळे स्पर्धक तन्वी कोलते सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. टास्कदरम्यान सागर कारंडे यांच्याशी झालेल्या भांडणात तन्वीच्या वक्तव्यावरून प्रेक्षकांसह अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली आहे.


    या प्रकरणावर अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. विनोदी कलाकारांना हलक्यात घेण्याच्या वृत्तीवर त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली असून, तन्वीच्या खेळण्याच्या पद्धतीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
    विशाखा सुभेदार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे—


    “सागर कारंडे मस्त खेळतोयस रे.. कॉमेडी करतो? जाम हलक्यात घेतात विनोदी कलाकारला… कोणीही कालच्या पोरींनी यावं टपली मारून जावं! ह्यांनी काय अनुभवलंय? असं किती काम केलं?? असो… शब्द पलटवले तिने नंतर! पण ही तन्वी पहिल्याच आठवड्यात साधारण दहाव्या आठवड्यात खेळतेय असं का खेळतेय? लगेचच दुसऱ्यांना ‘तू मला सपोर्ट करणार का’ वगैरे??? अगं असं काय केलंस इतरांसाठी की तू त्यांच्याशी डील करतेयस?? आधी ‘दिल’ तर जिंक त्यांचं..! ते मला वाटतं तिला शक्य नाही… किरकिर, कर्कश आवाज..! शी…”


    विशाखा सुभेदार यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चेला वेग आला असून, अनेक प्रेक्षकांनी त्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी हा वाद अनावश्यक असल्याची मतंही मांडली आहेत. आगामी भागांमध्ये हा वाद आणखी वाढतो का, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

    अशाच मनोरंजनविश्वातील ताज्या आणि अपडेटेड बातम्यांसाठी आमचं पेज नक्की फॉलो करा.

  • मतदार यादीतील गोंधळ; अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदानासाठी तासभर चकरा

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान विलेपार्ले येथे मतदार यादीतील गोंधळाचा प्रकार समोर आला. प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तब्बल एक तास मतदान केंद्रावरून केंद्रावर चकरा माराव्या लागल्या. या प्रकारामुळे त्यांनी निवडणूक यंत्रणेच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

    सराफ यांनी सांगितले की, “मी मतदान केंद्रावर गेले असता मतदार यादीत माझे नावच नव्हते. त्यानंतर मला २५ नंबरच्या केंद्रावर पाठवण्यात आले. तिथे माझे नाव सापडले, मात्र सिरीज नंबरच लिहिलेला नव्हता.” पुढे त्या म्हणाल्या, “सगळ्या सोसायट्यांचे गट ठरवून त्या-त्या मतदान केंद्रात मतदान करायचे असते, मग आमच्या इमारतीची नावे यादीत का नाहीत?”

    दरम्यान, संबंधित मतदान केंद्रावर पोहोचण्यापूर्वीच निवडणूक कर्मचारी निघून गेल्याने मतदानात आणखी अडथळे आले. “मोबाईल आतमध्ये नेण्यास परवानगी नसल्यामुळे मी या गोंधळाचा फोटोही काढू शकले नाही,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

    या घटनेमुळे मतदार यादीतील त्रुटी आणि निवडणूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, सामान्य मतदारांनाही अशाच अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची चर्चा आहे.

  • “तू मर्द असशील तर प्रपोज कर!” — आदेश बांदेकरांचा सोहमसाठीचा थेट आदेश चर्चेत.

    मराठी कलाविश्वातील नवविवाहित जोडपं सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी सध्या चर्चेत आहे. डिसेंबर २०२५ मध्ये सोहम आणि पूजाने लग्नाच्या बेडीत अडकत चाहत्यांना सुखद धक्का दिला. लग्नाआधी काही काळ दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

    लग्नानंतर पहिल्यांदाच सोहम आणि पूजाने त्यांची प्रेमकहाणी उघड केली आहे. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीसह पहिल्या प्रपोजचा भन्नाट किस्सा शेअर केला. विशेष म्हणजे, पूजाला प्रपोज करण्यासाठी थेट आदेश बांदेकर यांनी हस्तक्षेप केल्याचं सोहमने सांगितलं.

    सोहम म्हणाला, “मी ९ ऑगस्ट २०२४ रोजी पूजाला प्रपोज केलं. त्याआधी आम्ही साध्या गप्पा मारत होतो आणि मला तिच्या उत्तराचा अंदाजही आला होता. त्यामुळे मी घरी सगळं सांगितलं होतं. तेव्हा बाबा अमेरिकेत होते. ते रोज सकाळी मला ‘ऑल द बेस्ट’ असा मेसेज पाठवायचे. पण १५–२० दिवस काहीच अपडेट न दिल्यामुळे बाबा अस्वस्थ झाले.”

    तो पुढे सांगतो, “एक दिवस बाबांचा मेसेज आला — ‘तू मर्द असशील तर हिच्याकडून हो म्हणवून घे. मुलगी चांगली आहे. तुझ्या टेंटेटिव्हनेसमध्ये तिला गमावू नकोस; नाहीतर मीच तिच्याशी बोलेन!’ हा मेसेज वाचून मी अक्षरशः हललो.”

    पूजाच्या वाढदिवशी सोहम तिला फक्त डिनरला घेऊन जाणार होता. मात्र आई आणि चुलत बहिणीने त्याला अजूनच प्रोत्साहन दिलं. “आजच तिला विचार,” असं त्यांनी सांगितलं. अखेर डिनरदरम्यान सोहमने पूजाला प्रपोज केलं आणि पूजानेही ‘हो’ म्हणत त्याच्या प्रेमाला होकार दिला.

    आदेश बांदेकरांच्या एका स्पष्ट संदेशामुळे सुरू झालेली ही प्रेमकहाणी आज लग्नापर्यंत पोहोचली असून, सोहम–पूजाची जोडी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

  • सागर कारंडे Vs तन्वी कोल्ते : पहिल्याच टास्कमध्ये पेटलेला वाद, नेटकरी कोणाच्या बाजूने?

    कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या Bigg Boss Marathiच्या प्रोमोमध्ये घरात मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळत आहे. अभिनेता-कॉमेडियन सागर कारंडे आणि अभिनेत्री तन्वी कोल्ते यांच्यात वादाची ठिणगी पडल्याने शोची सुरुवातच चर्चेत आली आहे.


    प्रोमोनुसार, पतंग कापून नॉमिनेशन बॉक्समध्ये टाकण्याचा हा टास्क होता. या पहिल्याच टास्कमध्ये तन्वीने सागरची पतंग कापली आणि थेट म्हणाली की, “सागर कारंडे या शोसाठी अपात्र आहेत.” हा निर्णय ऐकताच सागर चांगलाच संतापलेला दिसतो. तो तन्वीला उद्देशून, “एवढी तरी अक्कल पाहिजे ना, नॉन्सेन्स… काय बोलतोय आपण,” असे म्हणतो.


    सागर चिडल्यानंतर तन्वीही प्रत्युत्तर देते, “मी नॉन्सेन्स आहे, तुम्ही बोलायची गरज नाहीये.” त्यावर सागर आवाज चढवत म्हणतो, “मी तुला आधीच म्हटलेलं, मी बोलताना मध्ये बोलायचं नाही.” यानंतर तन्वीही आवाज वाढवून, “एsss आवाजाला मी घाबरत नाही, तू मला शिकवणार?” असे म्हणताना दिसते.


    दरम्यान हा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तन्वीवर जोरदार टीका केली आहे.
    “तन्वीने वयाचे भान ठेवून वागायला हवे,”
    “हिला मोठ्यांशी बोलायची अक्कल नाही,”
    “मोठ्या माणसांशी नीट बोलायला शिक आधी,”
    “सागर कारंडेला फुल्ल सपोर्ट,”
    “पहिल्या दिवसांपासून ओव्हर अॅक्टिंग सुरू…”
    अशा अनेक प्रतिक्रिया कमेंट्समध्ये पाहायला मिळत आहेत.


    एकीकडे टास्कमधील स्ट्रॅटेजी, तर दुसरीकडे वादातील भाषा आणि सूर—या सगळ्यावरून प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगली आहे. आता पुढील एपिसोड्समध्ये हा वाद कोणत्या वळणावर जातो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
    तुमचा सपोर्ट कोणाला? सागर कारंडे की तन्वी कोल्ते?

    अशाच मनोरंजनाच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा.

  • 🔥 बिग बॉस मराठी ६: राधा पाटील आणि दीपाली सय्यद यांच्यात तुफान वाद | आजचा प्रोमो चर्चेत


    Bigg Boss Marathi 6 च्या आजच्या भागाच्या प्रोमोने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. घरात पहिल्याच आठवड्यात मोठा वाद पाहायला मिळणार असून Radha Patil आणि Deepali Sayyad यांच्यात जोरदार शाब्दिक संघर्ष झाल्याचे दिसत आहे.


    🔍 वादाचं कारण काय?
    प्रोमोमध्ये दीपाली सय्यद यांनी राधा पाटील यांच्या लावणी सादरीकरणावर आक्षेप घेतला आहे. लावणीच्या सादरीकरणावरून केलेल्या वक्तव्यामुळे राधा भावूक झाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. आपल्या कलेचा अपमान होत असल्याचा आरोप राधाने केला असून, तिने ठामपणे स्वतःची बाजू मांडली आहे.


    💥 घरात वाढतोय तणाव
    या वादामुळे बिग बॉसच्या घरातील वातावरण तापले असून इतर स्पर्धकही या संघर्षाकडे लक्ष देताना दिसत आहेत. हा वाद पुढे कोणतं वळण घेणार, याकडे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


    👀 प्रेक्षकांमध्ये चर्चा रंगात
    सोशल मीडियावर या प्रोमोची जोरदार चर्चा सुरू असून काही जण राधाच्या बाजूने उभे आहेत, तर काही दीपालीच्या मताला समर्थन देत आहेत.


    👉 तुमच्या मते या वादात कोण बरोबर आहे?
    कॉमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा.
    अशाच मनोरंजनाच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या वेबसाइटला भेट देत रहा. 🎬✨